एकेकाळी न्यायालयाचा जो दबदबा होता, तो आताशा का दिसत नाही? धनकड यांच्यासारखी घटनात्मक पदावरील व्यक्ती - ती ही स्वत: उत्तम वकील असलेली, अशी टीका टिप्पणी करायला का उद्युक्त होते? यात स्वत: न्यायपालिकेचा काहीच दोष नाही का? खरे तर न्यायपालिकेला तिचे दोष दाखवलेले; साधे प्रश्न विचारलेलेही चालत नाहीत, हाच जनतेच्या दृष्टीने मोठा दोष आहे. एके काळी संतुलित आणि सुसंगत दिसणारी न्यायालये आता अनेकदा स्व-विसंगत निर्णय देतात आणि वागतात हे लोकांच्या लक्षातही येते आणि खटकते सुद्धा.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या माध्यामातून डॉ. आंबेडकर जयंती दिवशी काळाराम मंदिरप्रवेशानंतर संध्याकाळी गोदावरी मातेच्या पवित्र तीरावर भव्य महाआरती पार पडली. नाशिकच्या या पुण्यप्रवाहात, समतेचा प्रकाश अधिक उजळला गेला. हा उपक्रम केवळ सवर्ण आणि आंबेडकरी अनुयायांचा संगम नव्हता, तर तो इतिहासाच्या काळ्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिलेले वर्तमान ठरला व समरसतेच्या उज्वल भविष्याचे बीजारोपण ठरला.
वक्फ बोर्ड विधेयक पारित करून सामान्य मुसलमानांच्या ऐहिक क्षेत्रात धर्माच्या नावाने लुडबूड करणार्या वक्फ मौलवींना लगाम घालण्यात आला आहे. हे ऐतिहासिक कार्य असून पू. डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित असलेलेच काम झालेले आहे.
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
डाव्यांच्या लाल ढालीने दिलेल्या या संरक्षणामुळे इस्लामच्या हिरव्या तलवारींची धार अधिकच वाढली. आपण काहीही केलं तरी त्याचं समर्थन करून आपल्यालाच ’व्हिक्टिम’ ठरवलं जाणार ही खात्री असल्यामुळे हमास, हेझबोल्ला, हौथी, आयएसआय, लष्कर, जैश, सिमी, पीएफआय... यांच्या कारवाया बिनदिक्कतपणे सुरूच राहिल्या आणि डाव्या वोक लिबरल्सनी केलेलं त्यांचं बेशरम समर्थनही.
हिंदू-मुस्लीम या मुद्द्यावर भारत सतत अशांत ठेवणे शक्य आहे हे पाकिस्तानला आणि भारताच्या अन्य शत्रूंना पुरते ठाऊक आहे. प. बंगालमध्ये त्यासाठी वक्फच्या निर्णयाचा बागुलबोवा उभा केला आहे. तर काश्मीरच्या खोर्यात धर्म विचारून हिंदूंच्या हत्या केल्या आहेत. त्या हिंदूद्वेषातून तर आहेतच; पण त्याचबरोबर या देशात शेकडो वर्षांपासून राहत असलेल्या मुस्लिमांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यापासून रोखणे आणि हिंदूंसोबत बरोबरीने उभे ठाकण्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे यासाठी खेळलेली खेळी आहे. या खेळीपासून सावध
आम्हाला उत्तुंग शिखर गाठायचं आहे. आणि आजच्या काळाचा विचार करता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, दळवळणाच्या क्षेत्रात, उद्योग व्यापार्याच्या क्षेत्रात मराठी माणसाला पुढे जायचे आहे. तो ध्येयवाद सोडून त्याच्या हातात भिकेचे वाडगे देणे हा छत्रपती शिवरायांचाच अपमान आहे.
जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर कोणावरही गुन्हेगाराचा शिक्का मारू नये हे कायद्यातील महत्त्वाचे तत्त्व. हे अलीकडच्या अनेक पत्रकारांच्या/वार्ताहरांच्या गावीही नसावे असे त्यांचे वर्तन असते. पत्रकार या नात्याने समोरच्या व्यक्तीला अभ्यासपूर्ण आणि संयत भाषेत प्रश्न विचारण्याऐवजी उलटतपासणीच्या आवेशात प्रश्न विचारणे योग्य नाही, हे शोभा देत नाही. त्यातून पत्रकारितेच्या खालावलेल्या पातळीचेच दर्शन घडते. जे चिंताजनकही आहे आणि धोकादायकही.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब लावरे हे हाडाचे संशोधक-शेतकरी आहेत. आपल्या शेतात नवनवीन वाणांची लागवड करून त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुण शोधतात. सध्या ते भाजीपाल्यातील वांगी व भोपळा या फळभाज्यांच्या गावठी वाणांवर संशोधन करत आहेत. सध्या ही दोन्हीही वाणे शासकीय प्रक्षेत्रावर प्रयोगासाठी पाठवली आहेत.
वराहमिहिर हे कृषी व जलक्षेत्रातील शास्त्रज्ञ समजले जातात. ‘बृहत् संहिता‘ या त्यांच्या ग्रंथात जलशास्त्रातील मेघवर्णन, मेघोत्पत्ती, जलगर्भोत्पत्ती, पर्जन्यवृष्टी या संदर्भात विस्तृत विवेचन आहे. जमिनीच्या पोटात असलेले पाणी कसे शोधावे याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती त्यात आहे.
मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी भेंडीचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. सुधारित तंत्राचा वापर केल्याने शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा भेंडीचे पीक घेण्यात अग्रेसर झाल्याने त्यास ‘ठाणे पॅटर्न’ म्हणून ओळखले जात आहे. बाजारपेठेतही ठाणे जिल्ह्यातील भेंडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
एक कट्टर स्वयंसेवक, निष्ठावान कार्यकर्ता, सहृदय मित्र आणि कुटुंबप्रेमी भीमसेन नावाचा माणूस 7 एप्रिल 2025 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. देशासाठी, समाजासाठी जीवन अर्पण करणारा एक सहृदय मित्र हरपला.
ज्येष्ठ संघप्रचारक, विश्व विभाग प्रमुख डॉ. शंकरराव तत्त्ववादी यांचे नुकतेच निधन झाले. अनेक देशातील त्यांच्या कार्यामुळे, आज हिंदू स्वयंसेवक संघ 50हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. काही कार्यक्रम विश्व विभागासाठी मैलाचे दगड सिद्ध झाले. विश्व विभाग संयोजक सौमित्र, विश्व विभाग सह-संयोजक डॉ. राम वैद्य आणि विश्व विभाग सह-संयोजक अनिल वर्तक यांनी शंकररावजी सोबतच्या आठवणींना उजाळा प्रस्तुत लेखातून दिला आहे.
डॉ. दत्ता नाईक सरांनी कधीही बडेजाव केला नाही. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ असे जीवन ते जगले व शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा व विश्वास दिला. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जीवनाचा मंत्र दिला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
ज्येष्ठ संघप्रचारक श्री. शंकरराव तत्त्ववादी यांच्या निधनाने संघ-क्षितिजावरील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. 1987 ला शंकरराव पूर्णकालीन संघप्रचारक निघाले. प्रारंभी, विदेश विभागात इंग्लडमधील संघ दृढ करण्याचे दायित्व त्यांच्यावर आले. 1994 ते 2012 असे सलग 18 वर्षे शंकरराव, ’विश्व विभाग प्रमुख’ म्हणून काम बघत होते. या काळात 50 पेक्षा अधिक देशात त्यांचा प्रवास होत असे. विदेशातील कित्येक कुटुंबांना शंकरराव आपल्याच परिवारातील घटक वाटत. एवढी आत्मीयता त्यांनी घराघरांत निर्माण केली होती .
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
प्रयागराज कुंभमेळ्यात सर्व काही अद्भुत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. त्यातून विराट हिंदू राष्ट्राचे दर्शन घडत आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, त्याचप्रमाणे महाकुंभात गेल्याशिवाय आणि डुबकी मारल्याशिवाय आनंद कळणार नाही! त्यामुळे मनात किंतुपरंतु न ठेवता महाकुंभात अवश्य जा! त्रिवेणी संगमात डुबकी मारा. प्रत्यक्ष कुंभमेळ्याचा अनुभव कथन करणारा लेख...
हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि प्रसिद्धीपराङ्मुख होऊन कृती करणारा आहे. भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि त्या माध्यमातून अखंड सेवाकार्य करणार्या संस्कृतीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ’हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन’ मेळाव्यात झाले. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव येथे सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत हा मेळावा संपन्न झाला.
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये