महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे; मात्र पुढील झेप घेण्यासाठी महसुली गुणवत्ता सुधारावी लागेल, खर्चाच्या रचनेत अधिक शिस्त आणावी लागेल आणि उत्पादनक्षम भांडवली गुंतवणुकीला अधिक प्राधान्य द्यावे लागेल. म्हणून या अर्थसंकल्पाचा खरा संदेश असा आहे की, महाराष्ट्राने आर्थिक वाढीची महत्त्वाकांक्षा तर स्पष्ट केली आहे; आता त्या वाढीला टिकाऊ आणि सक्षम वित्तीय पाया देणे ही गरज आहे.
आता चालू असलेले युद्ध हे भूमी जिंकण्यासाठी चाललेले नाही किंवा इराणच्या तेलसाठ्यावर ताबा मिळविण्यासाठी चाललेले नाही. दुसर्या महायुद्धाची ही कारणे होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळविणे, भूमी जिंकून घेणे, हे युद्धाचे हेतू आता राहिलेले नाहीत. हे युद्ध वर्चस्वाची लढाई आहे.
बोले सो निहाल, सत श्री अकाल ! या जयघोषाने जेव्हा नवी मुंबईचे आकाश दुमदुमले, तेव्हा तो केवळ एक आवाज नव्हता, तर ती लाखो अंतःकरणातील श्रद्धा आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती होती. ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादुरजींच्या 350 व्या शहिदी समागमाचे मुख्य राज्य समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडताना, या सोहळ्याचे भव्यत्व आणि त्यामागील आध्यात्मिक शक्ती जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. नवी मुंबईच्या पावन भूमीवर पार पडलेला हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ते सत्य, करुणा, धैर्य आणि सहिष्णुतेचे जिवंत दर्शन होते. य
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट मध्ये वीस राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती लावली; वेगवेगळ्या देशांतील साठेक मंत्र्यांनी हजेरी लावली; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील आघाडीची अशी पाचशे व्यक्तिमत्त्वे या परिषदेला उपस्थित होती; प्रदर्शनकेंद्रात तीनशेहून जास्त प्रदर्शकांनी आपल्या उत्पादनांची मांडणी केली होती व लाखो जणांनी या परिषदेस व प्रदर्शनास भेट दिली. आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताने दमदार वाटचालीला सुरुवात केली आहे याचे विलोभनीय दर्शन एआय इम्पॅक्ट परिषदेतून घडले.
ऑनलाईन गेम्स नियंत्रण ठेवणे हे आपल्याच हातात आहे. ही केवळ गेम्समधून व्यापार करण्याची पद्धत नाही, तर थेट राष्ट्रविरोधी शक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेले सौम्य युद्ध आहे की काय? अशी शंका निर्माण होण्यास बळ मिळत आहे. याचा शोध शासनाने घेणे आवश्यक आहे. तो शासन घेईलही. तूर्तास स्वत:चे कुटुंब, स्वत:ची मुले आणि राष्ट्राची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपण अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
फेसबुकवर दीड वर्षांपूर्वी ओळख, केरळमध्ये शूटिंग, सहा महिन्यांत जुळलेले प्रेम, मुलीनेच प्रपोज केले हे ठासून सांगणे, मुलीच्या घरच्यांचा विरोध, पोलीस संरक्षणात लग्न, मुद्दाम मुलीचे व मुलाचे निवासस्थान असलेल्या राज्यांपेक्षा निवडलेले सुदूर केरळ राज्य, त्यातही वामपंथी राजकीय नेत्यांचा वरदहस्त, कायद्याच्या कचाट्यात न सापडण्याची पुरेशी दक्षता घेणे हा घटनाक्रम पुरेसा बोलका आहे.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
यंदाच्या प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. कलाक्षेत्रातही महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे हेच यावरून अधोरेखित होते. यावेळेच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना होती, राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची. भारताचा 77 वा प्रजासत्ताकदिन 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्यपथावर भव्य परेडने साजरा करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन आणि अंमलबजावणी रक्षामंत्रालयातर्फे केली जाते. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कमिशन
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रू
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ या नवीन शाखेची स्थापना केली. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तसेच इस्रोकडून भविष्यातील चांद्रयान 5 आणि गगनयान मोहिमांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे यापुढे अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतीलच. नक्की या मोहिमा कशा असतील, त्याचबरोबर यापूर्वी ंयशस्वी झालेल्या मोहिमांबद्दल माहिती देणारा लेख...
वानप्रस्थाश्रम हा गृहापासून विरक्तीचा आणि वाढत्या एकांताचा काळ मनाला गेला. वानप्रस्थाश्रम म्हणजे एका कुटुंबकेंद्री व्यक्तीचा हळूहळू समाजकेंद्री व्यक्तीमध्ये विकास होणे. या संस्काराने स्वार्थसाधना करणारा मनुष्य आता समाजकल्याण करण्याकडे वळतो. समजाच्या हितासाठी निःस्वार्थ परोपकारी भावनेने जगण्याकडे झालेली ही उत्क्रांती आहे.
या वर्षीचा 101वा दत्तजयंती संगीत महोत्सव मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित झाल्यामुळे त्याची व्यापकता विस्तारली. दि. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान ’एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झालेल्या या स्वरोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी झाले होते. शहरातील अन्य कलासाधकांचा सहभाग, रसिकश्रोत्यांचा प्रतिसाद पाहता हा महोत्सव मराठवाड्यातील सवाई गंधर्व ठरू शकतो, ही आशा बाळगायला हरकत नाही.
नाशिकच्या ग्रमाविकासच्या कार्यकर्त्यांनी गारे काकांच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेल्या प्रेरणेने यंदाही वनवासी पाड्यात जाऊन भगिनींबरोबर भाऊबीज आणि स्नेहभोजन करून दिवाळी सण साजरा केला.
पुणे : हिंदू धर्मात ’गोदान’ करण्याचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. सवत्स धेनूचे दान अधिक पुण्यकारक समजले जाते. हिंदुस्थान प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित उपक्रम आपल्या संस्कृतीची सुंदर सामाजिक वीण अधोरेखित करतो. काळाच्या ओघात या संस्काराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि सध्याच्या स्थितीतही दुर्मीळ झालेला ’गोदान’ संस्कार कधीकधी घडतो. हा गोदानाचा संस्कार पुण्याजवळ, हिंगणघाट (उरळीकांचन) ता. हवेली येथे नुकताच पार पडला.
आर्द्रा नक्षत्राचे दैवत ’रुद्र’ (भगवान शिव) आहे. भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेला आणि ज्याच्या सुगंधाने मन आणि आत्मा दोन्ही तृप्त होतात, असा हा कृष्णागरू वृक्ष! कृष्णागरू झाडाला झालेली वेदना (संसर्ग) त्याच्यातील सुप्त सुगंधाला जागृत करते. हा वृक्ष मानवाला एक महान जीवनमंत्र देतो: संकटे आणि जखमा तुम्हाला संपवण्यासाठी नसतात, तर तुमच्यातील सर्वोत्तम गुणांना बाहेर काढण्यासाठी असतात. ज्याप्रमाणे बुरशीच्या संसर्गाशिवाय सामान्य लाकडाचे रूपांतर सुगंधी ’अगर’मध्ये होत नाही, तसेच आयुष्यातील संघर्षाशिवाय माणसाचे व्यक्ति
आकर्षित अशा भुलवणार्या जाहिराती आणि आश्चर्यात पाडणारे वजन कमी झाल्याचे फोटो पाहून फॅड डाएटच्या आभासी दुनियेच्या मागे धावण्यापेक्षा वैद्यकशास्त्रीय सल्ला घेऊन स्थूलत्वाचा मुकाबला करणेच सर्व दृष्टीने योग्य ठरते. याकरिता काही विशेष आहारपद्धतींची माहिती घेणे उचित ठरेल. या डाएट्सपैकी, आपल्याला जी रुचेल ती पद्धती वापरावी आणि सडपातळ न होता योग्य वजन सांभाळ्याचा प्रयत्न करावा.
राजकुमार तथा काका खिवंसरा यांच्यासारखे या युगातील सत्पुरुष वैश्वानर रूपाने अस्तित्वात असलेल्या नारायणाची सेवा करण्यात आपली इतिकर्तव्यता मानत होते. काकांनी फक्त रुग्णालयात अन्नदान केले नाही तर शहरातील वृद्धाश्रम, मोंढ्यातील (होलसेल मार्केट) हमाल, रोजंदारीवर काम करणारे कामगार, कुठल्यातरी मुलांच्या वसतीगृहात अशा रीतीने काकांनी आपला अन्नयज्ञ सुरू केला. जिथे तो सुरू केला तिथे तो आजतागायत सुरू आहे.
मृगशीर्ष नक्षत्राचा खैर हा वृक्ष आपल्याला ’ताकद’ आणि ’संरक्षण’ यांचा संदेश देतो. खैराचे लाकूड जसे अत्यंत कठीण असते आणि कितीही ऊन-पाऊस-वारा झेलून टिकून राहते, तसेच मानवी शरीर निरोगी आणि कणखर बनवण्याचे काम हा वृक्ष करतो. मृगशीर्ष नक्षत्राच्या व्यक्तींनी ’हरणासारखे’ चंचल न राहता, खैरासारखे स्थिर आणि मजबूत व्हायला हवे!
शेतीत यश मिळवण्यासाठी अंदाजावर नव्हे तर शास्त्रीय आणि खात्रीशीर माहितीवर अवलंबून निर्णय घेणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार-ए.आय. अॅप शेतकर्यांना अधिकृत, तज्ज्ञांनी पुष्टी केलेला सल्ला देणारे विश्वासार्ह डिजिटल साथीदार ठरत आहे.
शेतीत उत्पादन वाढवायचे असेल तर केवळ खतांचा मारा नव्हे, तर जमिनीचे आरोग्य समजून घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय कर्ब, सूक्ष्मजीव आणि मातीचा संतुलन बिघडल्याने आज शेती तोट्यात जात आहे. या पार्श्वभूमीवर माती परीक्षण व अन्नद्रव्य व्यवस्थापन नव्याने विचारात घेणे अपरिहार्य ठरते.. यासाठी भूसूक्ष्मजीव मोजमाप करणार्या प्रयोगशाळा जागोजागी उभारणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल.
बांबू विकासाचे चिनी मॉडेल ही केवळ कृषी किंवा उद्योगाची कहाणी नसून दूरदृष्टी, शास्त्रीय अभ्यास आणि काटेकोर अंमलबजावणी यांचा आदर्श नमुना आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या बांबूला चीनने आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन संस्था आणि मजबूत पुरवठा साखळीच्या माध्यमातून जागतिक उद्योगात रूपांतरित केले. शेतकरी, संशोधक, उद्योग आणि सरकार यांची सुसूत्र सांगड घालून बांबू ग्रामीण समृद्धीचे, रोजगारनिर्मितीचे आणि परकीय चलनाचे प्रभावी साधन कसा ठरला, याचा प्रेरणादायी मागोवा या लेखात घेतला आहे.
कोकणच्या निसर्गाशी आणि शेतकर्यांच्या जीवनाशी अतूट नातं असलेल्या नारळाचा उद्योग आज उत्पादन घट, कीड व व्यवस्थापन यामुळे अडचणीत आहे. माडांचे आरोग्य सुधारले तरच नारळ उत्पादन वाढेल आणि शेतकर्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होईल, हीच या लेखाची मध्यवर्ती भूमिका आहे.
आताच्या भारतीय संघाने हे विजेतेपद आपल्याकडे राखताना नवीनच आदर्श घालून दिला आहे. या संघाकडे विजयाचं सातत्य आहे, न डगमगणारं धैर्य आहे, समोरच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवण्याची मर्दुमकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकालाभिमुख खेळण्याची कणखर मानसिकता आहे. युवा खेळाडूंचा हा संघ खर्या अर्थाने निडर आहे. पराभवाने ते विचलित होत नाही. त्यांना आस आहे मोठ्या कामगिरीची. भारतीय संघाने मिळवलेलं यश पाहिलं तर, वैयक्तिक मापदंडांनी नाही तर सांघिक कामगिरीने या संघाने हे यश खेचून आणलं आहे. हे यश मिरवताना जे वर्चस्व राखलं आहे
क्रीडा विश्लेषक हा मन आणि कामगिरी यांना जोडणारा वैज्ञानिक दुवा आहे. हे आपल्याला मागील लेखामधून लक्षात आलेच असेल. खेळामध्ये मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मात्र एका मानसशास्त्रज्ञाचीच गरज भासते.
भारताचा एकोणीस वर्षांखालील संघ, जो देशाचं क्रिकेटमधील भविष्य आहे, त्यांनी विक्रमी सहाव्यांदा युवा विश्वचषक जिंकून भारताचं भविष्य किती सुरक्षित आहे हे दाखवून दिलं आहे. भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाने इंग्लंडवर 100 धावांनी मात करत सहाव्यांदा आयसीसी युवा विश्वचषक उंचावला. आयसीसीची एखादी स्पर्धा सर्वाधिक सहावेळा जिंकणारा भारत हा पहिला संघ आहे. त्यासाठी जे निर्विवाद वर्चस्व, जिगर, कठोर मानसिकता, आत्मविश्वास मैदानावर दाखवावा लागतो, तो या युवा संघाने दाखवला आहे.
शारीरिक आणि मानसिक ताकदीच्या जोरावर ग्रँडस्लॅम टेनिसच्या खेळातील सातत्य जोकोविचने टिकवून ठेवलं आहे. वयाच्या 38व्या वर्षीही पहिला सेट त्याने जिंकला तर सामनाही तो जिंकतोच, हा लौकिक त्याने कायम ठेवला आहे. आकडेवारीच तसं सांगते. आणि दुसरं म्हणजे, आहे ती परिस्थिती स्वीकारण्याचा समजूतदारपणाही त्याने दाखवला आहे. ‘400’ विजयांचा टप्पा त्याने नुकताच पार केला आहे.
1977 आणि 1980 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला. लोकसभेत त्यांची भाषणे नेहमी अभ्यासपूर्ण, संयत आणि प्रभावी असत. विरोधकांनाही ऐकून घेण्याची तयारी, तथ्यांवर आधारित युक्तिवाद आणि संसदीय परंपरांचा आदर यामुळे ते सर्वपक्षीय मान्यता मिळवणारे नेते ठरले. जनतेच्या दैनंदिन अडचणी-रोजगार, पाणीपुरवठा, नागरी सुविधा यांसोबतच देशहिताचे व्यापक मुद्दे त्यांनी मांडले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी असते, हा संदेश त्यांच्या कार्यात
‘वन्दे मातरम्’ विषयाचे पूर्ण वर्षभर कार्यक्रम करून हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहाणारे ’वन्दे मातरम्’ जागराचे प्रणेते मोहनराव अळवणी. पुण्याच्या संघसमर्पित व्यक्तींच्या नामावळीतील मोहनराव अळवणी यांचे 8 फेब्रुवारी 2026रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले.
जीवनाचा मूलार्थ सांगून कर्म-उपासना बळकट करण्याचा संदेश प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी प्रत्यक्ष आचरणातून साधकांना दिला. आज जरी ते देहाने आपल्यात नसले, तरी त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यातील ‘शककर्ते शिवराय’ हा एक युगप्रवर्तक ग्रंथ ठरला आहे. त्यांनी स्थापन केलेली उपासना केंद्रे आणि त्यांनी दिलेले विचार हे येणार्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. ‘धर्मभास्कर’ ही विद्वत जनांनी दिलेली पदवी, त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवली. महाराष्ट्राच्या मातीतील हा ‘सांस्कृतिक दीप’ सदैव तेवत राहील यात शंका नाही. या ध्येयन
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर हे दिसायला अत्यंत साधे, पण विचारांनी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवास्थानी ’ज्ञानेश्वरी’चे पारायण आणि इतिहासाचे संशोधन एकाच वेळी चालत असे. ते म्हणत की, इतिहास आपल्याला बदला घेण्यासाठी नाही, तर भविष्य सुधारण्यासाठी शिकायचा असतो. अलीकडच्या काळात इतिहासाचे जे काही ’रंजन’ केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली. पैठणच्या मातीतील सातवाहन, यादवांचे देवगिरी, मलिक अंबरची नहर पद्धत आणि संतांची मांदियाळी या सर्वांना आपल्या लेखनातून जोडण
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये