‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे अत्यंत गोपनीय आणि कडक सुरक्षेखाली पार पाडली जात असली तरी त्यात त्रुटी राहत असल्याचे आता वारंवार उघड आहे. केवळ चौकशी समित्या नेमणे किंवा जुजबी मलमपट्टी करणे आता पुरेसे नाही. तर संपूर्ण परीक्षा पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल करणे अनिवार्य आहे. तरच भारतातील वैद्यकीय शिक्षणाची पवित्रता परत मिळवणे शक्य होईल.
जागतिक राजकारणात कोणताही देश दुसर्या देशाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो; कायमस्वरूपी असतात ते फक्त राष्ट्रीय हितसंबंध. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटी या केवळ आयात-निर्यातीपुरत्या मर्यादित नसून, त्यामागे जागतिक अर्थकारण, भू राजकारण आणि भविष्यातील आर्थिक शक्तिसंतुलनाचे व्यापक गणित दडलेले आहे.
सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांत पिकणाऱ्या श्रीधान्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील मालपाडा (कंजाला) येथे महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित आदिवासी मिलेट प्राथमिक प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले आहे. या ऐतिहासिक उपक्रमामुळे श्रीधान्याला मूल्यवर्धन, आदिवासी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न, स्थानिक युवकांना रोजगार आणि सातपुड्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला विकासाची नवी गती मिळणार आहे.
कालपर्यंत बांगलादेशात मार सहन करणारा हिंदू आज आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला होता. आपल्या आराध्य देवतेच्या विटंबनेचा तो निषेध करत नव्हता. बांगलादेश सरकारला निर्वाणीचा इशारा देत होता. पण पश्चिम बंगालच्या निवडणुकांनी बरंच काही बदललं आहे. आता पश्चिम बंगालबरोबरच बांगलादेशातील हिंदू आत्मविश्वासानं, संघटितपणे उभे राहत आहेत. ते ‘हिंदू महाजोट’ या संघटनेच्या माध्यमातून भगवान श्रीरामांच्या अवमानाच्या निषेधार्थ आंदोलन करीत होते. हा मोर्चा पाहून संपूर्ण ढाका थक्क झाला होता..! हे नक्की का घडले याबद्दल माहिती सांगणारा लेख
साल 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ सुरू झाला आणि जगभरात योगाच्या आपल्या प्राचीन परंपरेला मानाचं स्थान मिळालं. यंदाची योग दिवसाची संकल्पना आहे, ’धेसर ऋेी कशरश्रींहू असशळपस’ म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. वृद्धत्व आनंदी, निरोगी घालवायचं असेल तर तरुणपणापासून योगाची कास धरायला हवी, योग दिनाचे औचित्य साधत ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
या देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थळी-अयोध्येत त्यांचे मंदिर उभे राहावे यासाठी देशभरातल्या करोडो हिंदू भाविकांनी थोडीथोडकी नव्हे तर पाचशे वर्षे संघर्ष केला. नव्वदच्या दशकात संघ परिवारातील ’विश्व हिंदू परिषदे’च्या पुढाकाराने साधुसंतांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाने या लढ्याला अधिक संघटित आणि अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. ’मंदिर वही बनायेंगे’ ही सर्वसामान्य हिंदू भाविकांनी
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
कुटुंबव्यवस्था ही सक्षम समाजाचा भक्कम पाया असते. मात्र गेल्या काही वर्षांत या व्यवस्थेलाच तडे जात आहेत. विभक्त कुटुंबपद्धती, एकल पालकत्व, खाजगी आयुष्याचा ताबा घेतलेली समाजमाध्यमे, त्यातून संपलेला संवाद, शैक्षणिक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा आणि ताणतणाव, संस्काराचा अभाव अशी अनेक कारणे या व्यवस्थेस छेद देण्यास कारणीभूत आहेत. त्याच्या परिणामांचे दृश्यरूप म्हणजे समाजात होणार्या दुर्दैवी घटना होत.
‘संस्कारगाथा’ म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर आयुष्य सुंदर जगण्याची कला आहे. जन्मापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंतचे सोळा संस्कार माणसाचे चारित्र्य घडवून शाश्वत विकासाचा पाया रचतात. पाश्चिमात्य जगाची धाव भौतिक सुखाकडे असताना, आपली संस्कार व्यवस्था मनाची शुद्धी आणि कौटुंबिक जिव्हाळा जपायला शिकवते. या लेखमालेच्या अंतिम भागात हाच संदेश दिला आहे की, संस्कारांची हीच शिदोरी उद्याचा सशक्त समाज आणि समर्थ राष्ट्र घडवू शकते.
हिंदू संस्कार म्हणजे केवळ कर्मकांड नसून ती गर्भाधानापासून अंत्यविधीपर्यंत मानवी जीवन उन्नत करणारी एक सुसंगत जीवनप्रक्रिया आहे. इतर धर्मांतील विधींच्या तुलनेत हिंदू संस्कारांचे वेगळेपण नेमके कशात आहे आणि ते व्यक्तीची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक घडण कशी करतात, याचा सखोल आढावा या लेखात घेतला आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक ऊर्जा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार्या या संस्कारमालेचे सार हा लेख मांडतो.
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले, अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आणि संन्यास धर्माचे महत्त्व वाढणारे आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी अलौकीक कार्य केले आहे. या भारतमातेच्या सुपुत्राला अभिवादन करणारा लेख..
अलिबागस्थित श्रीक्षेत्र कनकेश्वराच्या शिखरावर जून 1876 साली श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामीजींनी श्री रामसिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. आध्यात्मिक साधनेसोबत समाजसेवेचे व्रत त्यांनी गणेशभक्तांना दिले. यंदाचे वर्ष हे श्री रामसिद्धिविनायक मंदिराचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
बीड बायपास येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्रीराम नवमीच्या दिवशी विधिवत शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला. संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय शिक्षण संकुलामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजियोथेरेपी कॉलेज सुरू झाले आहे.
‘हस्त नक्षत्राचा’ आराध्य वृक्ष म्हणून ‘अम्बष्ठतरु’ ओळखला जातो. या अम्बष्ठतरुवरून अभ्यासकांमध्ये ‘जाई’ आणि ‘रिठा’ असे दोन मतप्रवाह आहेत. या लेखामध्ये जाई आणि रिठा या दोन्ही वनस्पतींचे धार्मिक महत्त्व, आयुर्वेदातील औषधी गुणधर्म आणि आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले फायदे सांगितलेे आहेत. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी या वनस्पती कशा आरोग्यदायी ठरू शकतात, याचा वेध घेणारा लेख.
सर्व आजारांच्या उपचारांमध्ये व्यायाम करणे अतिशय गरजेचे असते आणि या व्यायामांमध्ये, सर्वात सोपा आणि परवडणारा एकच व्यायाम; तो म्हणजे चालणे! बिनपैशांचा हा व्यायाम (चालणे) अतिशय लाभदायी आहे. त्याची अगदी नेमकी माहिती आपण या लेखात बघूया.
केवळ शारीरिक कष्ट म्हणजे व्यायाम नव्हे, तर शास्त्रशुद्ध आणि नियमित हालचालीच शरीराला निरोगी व सुडौल कशा बनवतात, वजन नियंत्रणापासून ते गंभीर आजार टाळण्यापर्यंतच्या व्यायामाच्या शास्त्रीय बाजू समजून घेण्यासाठीचे मार्गदर्शक विश्लेषण.
वटवृक्ष आणि पिंपळाच्या विस्तीर्ण कुळातला ‘प्लक्ष’ म्हणजेच पायरी हा निसर्गाचा एक दुर्लक्षित ठेवा आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आयुर्वेदातील प्रसिद्ध ‘पंचवल्कल’ सूत्राचा एक सुवर्णतारा आहे. आपल्या शीतल सावलीने सजीव सृष्टीला एकत्र आणणारा हा महावृक्ष केवळ पर्यावरणाचा रक्षक नाही, तर आरोग्याचा आणि परोपकाराचा एक अद्भुत वारसा आहे.
बालपणात रस्त्याच्या कडेला अवघ्या 25 पैशांना फणस विकणार्या हरिश्चंद्र देसाई यांनी या फळाला ग्लॅमर प्राप्त करून दिले आहे. आपले कृषी अभियंता सुपुत्र मिथिलेश यांच्या साथीने त्यांनी आज फणस शेतीची एक नवी क्रांती उभी केली आहे. वडलांचा प्रदीर्घ अनुभव आणि मुलाची तंत्रज्ञानाची जोड, या दोन्हींच्या समन्वयातून देसाईंनी झापडे या गावी तब्बल 86 जातींच्या फणसांची अनोखी फळबाग फुलवली आहे. महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य फणस रोपवाटिका आणि ‘जॅकफ्रुट किंग अॅग्रो कंपनी’ स्थापन करणार्या व ‘फणसकिंग’ म्हणून लोकप्रिय असणार्या या प
जागतिक हवामान बदलामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत असून, त्याचा सर्वाधिक फटका लहान व अल्पभूधारक शेतकर्यांना बसत आहे. शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने जागतिक बँकेच्या मदतीने ’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ म्हणजे ’पोकरा 2.0’ सुरू केला असून, त्यातील फळबाग लागवड योजना परिवर्तनाची नवी संधी ठरत आहे.
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण, जलस्रोत आणि मानवी आरोग्यासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण जगभरासाठी चिंतेचा विषय ठरले आहे. अशा वेळी चीनने बांबूला ‘प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय’ म्हणून पुढे आणत एक नवा मार्ग दाखवला आहे. बांबूच्या नैसर्गिक, जैवविघटनक्षम आणि शाश्वत गुणधर्मांचा उपयोग करून प्लास्टिकच्या ‘भस्मासुराला’कसा आवर घालता येऊ शकतोे, याचा वेध घेणारा हा लेख..
'एल निनो’मुळे यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ शेतकर्यांना नव्हे, तर नागरी भागालाही पाण्याची टंचाई अनुभवावी लागेल, असं चित्र दिसत आहे. खरं तर, हा धोका ही आपल्यासाठी जलव्यवस्थापनाचं नियोजन करण्याची एक संधी आहे; आजवर आपण या विषयावर गांभीर्यानं विचार केला नसेल, तर तो आता करण्याची वेळ आली आहे. याबाबत आपण या लेखात ढोबळ मानानं विचार करूया.
मैदानातील खेळाचा थरार कॅमेर्यात टिपून लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारे ’स्पोर्ट्स व्लॉगिंग’ हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर तो एक प्रचंड आर्थिक उलाढाल असलेला करिअर पर्याय बनला आहे. क्रीडाप्रेमी तरुणांना आपल्या आवडीचे रूपांतर मोठ्या व्यवसायात कसे करता येईल, याचे हे मार्गदर्शन! डिजिटल युगातील या नव्या संधी, कमाईची साधने आणि यशाची सूत्रे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.
केवळ निसर्ग दर्शन किंवा देवदर्शन एवढ्यापुरतेच आता पर्यटन मर्यादित राहिलेले नाही. मैदानातला खेळ आणि प्रवासाची ओढ जेव्हा एकत्र येते, तेव्हा जन्म होतो तो ‘स्पार्टस् टुरिझम’चा! आयपीएलची मॅच असो किंवा साहसी ट्रेकिंग, आजचा तरुण या खेळांच्या निमित्ताने जग पालथे घालतोय. केवळ छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता भविष्यातील एक महाकाय अर्थव्यवस्था आणि करिअरची मोठी संधी म्हणून आकाराला येतोय. येत्या काळात क्रीडा पर्यटनामुळे रोजगाराची कोणती नवी दालने उघडणार आहेत? याचा हा वेध...
खेळ सुरळीत, न्याय्य आणि विश्वासार्ह राहण्यासाठी मैदानावर दिसणार्या खेळाडूंइतकाच महत्त्वाचा एक अदृश्य आधार म्हणजे अंपायर आणि रेफरी. त्यांच्या निर्णयक्षमतेवर संपूर्ण खेळाची दिशा, गती आणि अंतिम निकाल अवलंबून असतो. अंपायर आणि रेफरी ही भूमिका आज पूरक न राहता, स्वतंत्र ओळख आणि वाढत्या संधींसह एक सन्माननीय करिअर म्हणून उभी राहत आहे.
क्रीडा पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे. खेळातील सत्य, भावना आणि प्रेरणा जगासमोर मांडण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. जर तुम्हाला खेळाची आवड, लेखनाची ताकद आणि सत्य शोधण्याची जिद्द असेल, तर क्रीडा पत्रकारिता तुमच्यासाठी एक उत्तम, रोमांचक आणि प्रभावी करिअर ठरू शकते.
‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ (MRM)चे राष्ट्रीय संयोजक, संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि इस्लाम-ख्रिश्चन धर्माचे गाढे अभ्यासक विराग पाचपोर यांचे 18 जून 2026 रोजी निधन झाले. राष्ट्रीय मुस्लीम मंचाच्या कार्यात विरागजी यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यांचा शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि दूरदर्शी विचार यामुळे ते सर्वांना प्रिय होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा कार्यवाह आणि निष्ठावान स्वयंसेवक लव शंकरराव शिंदे यांचे अचानक झालेले निधन हा संघ परिवारासाठी मोठा धक्का आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा लेख..
पुण्यातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि ‘गो विज्ञान संशोधन संस्थे’चे कार्यवाह बापूराव कुलकर्णी यांचे 11 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या प्रेरक स्मृतींना आणि अलौकिक संघजीवनाला वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली.
विवेक पुस्तक प्रकाशनतर्फे 13 एप्रिल 2026ला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकातील एक प्रकरण विवेकच्या वाचकांसाठी...
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
Indian Politics Changed After 2014: नवभारताची स्पंदने भाग १: २०१४ नंतर कसा बदलला राजकारणाचा सारीपाट?
नवभारताची स्पंदने भाग 2: हिंदुत्वाची नवी परिभाषाराष्ट्रवाद आणि विकास
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये