पहलागाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्यदले कठोर प्रत्युत्तर देईल याची प्रतीक्षा सारे भारतवासीय करीत होते. 7 मे च्या पहाटे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. अॅक्शन -रिअॅक्शन स्वाभाविक असल्या तरी त्यासाठी केलेला विचार खूप महत्त्वाचा असतो, हेच भारत सरकारने केले आहे. कोणतेही राष्ट्र बलशाली तीन स्तंभांवर होत असते- सिद्धता, सतर्कता आणि संयम. भारत सरकारने या कृतीतून त्याचेच दर्शन दिले आहे.
निकोप समाजरचनेसाठी व सामाजिक न्यायासाठी जातीनिर्मूलन अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र ते करताना जातींची वीण अधिकच घट्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. एकाचवेळी, जातींवरून झालेल्या अन्यायाचे परिमार्जनही झाले पाहिजे आणि जातींचे गंड वा जातीयवाद बोकाळणार नाही याची खबरदारीदेखील घेतली गेली पाहीजे. असा समतोल साधतच पुढे जावे लागेल. जातनिहाय जनगणनेच्या वेळी इतके भान सर्वांनी ठेवले तर त्यातून सकारात्मक काहीतरी करता येईल व नवे सामाजिक प्रश्न उभे राहणार नाहीत.
भारताने आता फणा उगारलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विश्वासाचे सार्थक केले आहे. मोदी शांत बसणार नाहीत, ते वचपा काढतीलच, याची प्रत्येक भारतीयाला खात्री होती. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीचा अवलंब करून पाकिस्तानला घाबरवून सोडले. भारत हल्ला करणार म्हणून पाकिस्तानाने सैन्याची जमवाजमव केली. सैन्य सीमेवर आणले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या डोक्यावरून क्षेपणास्त्रे सोडली.
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
आजवर पाकिस्तानने जगभरातून भीक मागून केवळ भारताविरोधात दहशतवादी तयार करण्याचं काम केलं आणि सातत्याने भारतावर भ्याड, विकृत दहशतवादी हल्ले केले. पहलगाम हल्ल्याने या विकृतीचं टोक गाठलं. आता शिशुपालाच्या शंभर अपराधांचा घडा भरला आहे. एका जबाबदार, परिपक्व, वेगाने विकसित होत असलेल्या लोकशाही राष्ट्राच्या संयमाचा अंत इस्लामी दहशतवादाच्या या विचारसरणीने पाहिला. परिणामी हा हलकल्लोळ पाकिस्तानच्या नशिबी आला आहे. तो पुढे किती काळ आणि कसा चालेल हे सांगता येणं अशक्य असलं तरी भारताच्या किंबहुना दक्षिण आशियाच्या राजकीय इतिहा
दहशतवादी संकट देशावर पुन्हा कधीही ओढवू नये. पण आलेच तरी त्याचा प्रतिशोध आपण समर्थपणे घेऊ शकतो याची खात्री भारतीयांना पटली आणि जगालाही. या संकटाने सर्वांना दिलेली ही प्रचिती आहे...यह नया भारत है...
मनातील माया, मोह, प्रपंचात गुंतवणारे विकार विचार यांचा त्याग मलाच करायचा आहे. स्वामी म्हणतात, मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. विषम काळी मी घरदार, नातेवाईक, सवंगडी या सुहृदांचा त्याग करून तुझ्या साक्षात्कारासाठी इथवर आले आहे. मागील सर्व मायापाश मी तोडून टाकले आहेत. मला कसलेही आकर्षण उरले नाही. मी परत जांबगावी जाऊन माझे नातेवाईक व सवंगडी यांना भेटेन की नाही ते मला माहीत नाही. आता तूच माझा जीवलग, सखा सर्वस्वी आहेस. तुझ्याशिवाय दुसरा कोणी माझा स्वामी नाही. तुझ्या दर्शनाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिझम, साम्यवाद, समाजवाद या विचारांच्या संभ्रमात, भारत दिशाहीन होत असताना मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात 1965 मध्ये ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानावर त्यांनी आपले विचार प्रकट केले होते. त्या तारखा होत्या 22 ते 25 एप्रिल आणि साठ वर्षानंतर याच तारखांना त्याच ऐतिहासिक वास्तूत पंडितजींच्या विचारांना युवा पिढीसमोर मांडण्यात आले.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब लावरे हे हाडाचे संशोधक-शेतकरी आहेत. आपल्या शेतात नवनवीन वाणांची लागवड करून त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुण शोधतात. सध्या ते भाजीपाल्यातील वांगी व भोपळा या फळभाज्यांच्या गावठी वाणांवर संशोधन करत आहेत. सध्या ही दोन्हीही वाणे शासकीय प्रक्षेत्रावर प्रयोगासाठी पाठवली आहेत.
वराहमिहिर हे कृषी व जलक्षेत्रातील शास्त्रज्ञ समजले जातात. ‘बृहत् संहिता‘ या त्यांच्या ग्रंथात जलशास्त्रातील मेघवर्णन, मेघोत्पत्ती, जलगर्भोत्पत्ती, पर्जन्यवृष्टी या संदर्भात विस्तृत विवेचन आहे. जमिनीच्या पोटात असलेले पाणी कसे शोधावे याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती त्यात आहे.
मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी भेंडीचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. सुधारित तंत्राचा वापर केल्याने शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा भेंडीचे पीक घेण्यात अग्रेसर झाल्याने त्यास ‘ठाणे पॅटर्न’ म्हणून ओळखले जात आहे. बाजारपेठेतही ठाणे जिल्ह्यातील भेंडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
संघटन विस्तार व दृढीकरण यासाठी रामदासजींनी अक्षरशः अकराही जिल्हे पिंजून काढले. बैठका, अभ्यासवर्ग, अधिवेशनांचे आयोजन, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण एकापाठोपाठ एक सारखे सुरू असायचे. अशा असंख्य छोट्या-छोट्या प्रयोगातून कार्यकर्त्यांचे एकजिनसी विदर्भव्यापी जाळे विणण्यात रामदासजी यशस्वी झाले.
भारतीय अवकाश विज्ञान कार्यक्रमाला वेगळी दिशा देणारे, भारतीय अवकाश विज्ञान संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविलेले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे अध्यक्ष, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्य केलेले आणि केवळ राष्ट्रीय नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांचा भाग असणारे, आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी, विज्ञानसेवेसाठी वाहिलेले, ज्येष्ठ दूरदर्शी वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन. अलीकडेच त्यांचं निधन झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा धावता आढावा.
एक कट्टर स्वयंसेवक, निष्ठावान कार्यकर्ता, सहृदय मित्र आणि कुटुंबप्रेमी भीमसेन नावाचा माणूस 7 एप्रिल 2025 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. देशासाठी, समाजासाठी जीवन अर्पण करणारा एक सहृदय मित्र हरपला.
ज्येष्ठ संघप्रचारक, विश्व विभाग प्रमुख डॉ. शंकरराव तत्त्ववादी यांचे नुकतेच निधन झाले. अनेक देशातील त्यांच्या कार्यामुळे, आज हिंदू स्वयंसेवक संघ 50हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. काही कार्यक्रम विश्व विभागासाठी मैलाचे दगड सिद्ध झाले. विश्व विभाग संयोजक सौमित्र, विश्व विभाग सह-संयोजक डॉ. राम वैद्य आणि विश्व विभाग सह-संयोजक अनिल वर्तक यांनी शंकररावजी सोबतच्या आठवणींना उजाळा प्रस्तुत लेखातून दिला आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
प्रयागराज कुंभमेळ्यात सर्व काही अद्भुत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. त्यातून विराट हिंदू राष्ट्राचे दर्शन घडत आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, त्याचप्रमाणे महाकुंभात गेल्याशिवाय आणि डुबकी मारल्याशिवाय आनंद कळणार नाही! त्यामुळे मनात किंतुपरंतु न ठेवता महाकुंभात अवश्य जा! त्रिवेणी संगमात डुबकी मारा. प्रत्यक्ष कुंभमेळ्याचा अनुभव कथन करणारा लेख...
हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि प्रसिद्धीपराङ्मुख होऊन कृती करणारा आहे. भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि त्या माध्यमातून अखंड सेवाकार्य करणार्या संस्कृतीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ’हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन’ मेळाव्यात झाले. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव येथे सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत हा मेळावा संपन्न झाला.
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये