( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
Read More
( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे.
( maharashtra cabinet will be paperless ) फडणवीस सरकारच्या यापुढच्या कॅबिनेट ‘पेपरलेस’ होणार आहेत. राज्यात लवकरच ई-मंत्रिमंडळ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार असून, असा निर्णय घेणारे करणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य ठरणार आहे.
मुंबई : ( ecosystem for investment in every district Devendra Fadanvis ) “महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागांत गुंतवणूक व्हावी, यासाठी ‘इकोसिस्टम’ तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी दिली.
( Pandharpur Corridor work begin in three months Devendra Fadanvis ) “पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली.
( Tulja Bhavani Temple will become a world-class religious and cultural tourist destination Devendra Fadanvis ) तुळजाभवानी मंदिर आता जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि. २९ मार्च रोजी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली.
( Maharashtra will be EV Manufacturing National Capital Devendra Fadanvis ) “डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांमुळे होणार्या प्रदूषणाचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक ‘ईव्ही’वर आणण्याबाबत ठोस नियोजन केले जात आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईव्ही’ उत्पादनाचे अतिविशाल प्रकल्प सुरू होत आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र ‘ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे नॅशनल कॅपिटल’ म्हणून नावारुपास येईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी विधान परिषदेत व्यक
( Chief Minister Devendra Fadanvis on RERA fraud case ) ‘रेरा’ फसवणूक प्रकरणी त्या ६५ बांधकामांमधील एकाही रहिवाशांला बेघर होऊ देणार नाही. खोटे कागदपत्रे सादर करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना फसवले आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी अधिवेशनात जाहीर केले.
Bhaskar Jadhav ‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ अशी उबाठा गटाच्या भास्कर जाधव यांची गत. पण, त्यांची कुकर्मे विसरून जातील, इतके महाराष्ट्रातील लोक विसरभोळे नाहीत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी त्यांनी ना ना तर्हेचे प्रयत्न करून पाहिले, पण ते अयशस्वीच ठरले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या घटिकेपर्यंत ते आशावादी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शेवटपर्यंत पायघड्या घातल्या, भर सभागृहात त्यांचे तोंडभरून कौतुक वगैरेही केले. देवाभाऊ राग विसरतील आणि पदरात घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती.
( Special incentives for 19 projects signed in Davos Devendra Fadanvis ) दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केलेल्या एकूण १७ प्रकल्पांना ‘सामूहिक प्रोत्साहन योजने’बरोबरच थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित धोरणानुसार अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मान्यता दिली. तसेच अन्य दोन प्रकल्पांना त्यांच्या गुंतवणुकीनुसार अतिविशाल प्रकल्प म्हणून विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
( Kumbh Mela Authority Act will be introduced like Uttar Pradesh Devendra Fadanvis) “उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच अमलात आणला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, “त्र्यंबकराजाच्या अंगणातील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणाला चालना देण्यासाठी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरुवात करा. यासोबतच ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याचीही दक्षता घ्या.
Nagpur Riots राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील दंगलीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. नुकत्याच नागपूरातील झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून होणार आहे.
( The responsibility of constructing the Shiv Smarak in Agra falls to the Tourism Department Devendra Fadanvis ) आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीदिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वित आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.
( Two airports to be connected by metro Devendra Fadanvis ) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मुंबई ‘मेट्रो ८’ प्रकल्प हाती घेतला आहे.
Maharashtra Budget 2025 मध्ये संस्कृती संवर्धनासाठी विशेष तरतूदी
( Devendra Fadnavis on team india ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार विजय मिळवल्याबद्दल सोमवार, १० मार्च रोजी विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे तोंडभरून कौतुकही केले.
Maharashtra Budget 2025 जगभरात आर्थिक तणावाची स्थिती असताना, महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटू न देता, अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १० मार्च रोजी ७ लाख २० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. शेती, शेतीपुरक क्षेत्रे, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आदी क्षेत्रांसाठी भरीव तरतूद त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प, असे त्याचे वर्ण करावे लागेल.
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.
राज्यातील खनिकर्म विभागासाठी पर्यावरण, महसूल, भूसंपादन आणि वन विभागातील प्रलंबित कामे फास्ट ट्रॅक वर घेवून राज्यात १४ खाणी सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महसूल वाढवण्यावर भर देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी दिली.
Devendra Fadanvis महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरण आणि या धोरणाच्या मसुद्याला मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
Jalgoan Train Accident जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकींनंतर माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या विकासकामांचा उल्लेख केला.
कठोर मेहनत, संयमी वृत्ती, विकासाची जिद्द, संघटनेचे बळ आणि जनसेवेचा ध्यास यांचे अतुलनीय मिश्रण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! विरोधकांनी राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही यथेच्छ चिखलफेक केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकांवर अढळ राहिले. तेव्हा, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ ते ‘अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता हैं’ याचा प्रत्यय यंदाच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिला. फडणवीसांच्या अशा या उंच गरुडभरारीच्या अद्वितीय यशाचा आलेख मांडणारा हा लेख...
कंटाळलेल्या आणि मनातून संतप्त झालेल्या सुज्ञ मतदारांनी विरोधकांच्या या कटकारस्थानांचा सोक्षमोक्ष लावल्यानंतर, देवेंद्र यांच्या नेतृत्वातच राज्याच्या विकासाची गाडी रूळावर येण्यास वेळ लागणार नाही. किंबहुना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र आणि अजित पवार यांच्या साथीने, ती गेल्या अडीच वर्षांत आल्याचे जनतेने बघितले होते. आता हा वेग संतुलित ठेवण्याचा आणि जनतेची कामे गतीने पूर्ण करण्याचा काळ सुरू झाल्याची भावना, तीन आश्वस्त चेहर्यांमुळे निर्माण झाली आहे, असे म्हणायला बराचसा वाव आहे. एकनाथ शिंदे यांचे ल
Devendra Fadanvis यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर अगदी निश्चितपणाने लक्षात येते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये त्याला मिळणारे आजूबाजूचे वातावरण, मिळणारे संस्कार, त्यातून होणारी जडणघडण आणि जीवनमूल्यांना येणारे महत्त्व, त्यातून साकारणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व यातूनच देवेंद्रजी निश्चितपणाने सर्वच राजकीय नेत्यांमध्ये उजवे ठरतात.
महाराष्ट्राच्या राजकारणातील कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आता तिसर्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधिमंडळ गटाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली. राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे जुळवून भाजपने योग्य चेहरा निवडला आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण एका चांगल्या सुसंस्कृत वातावरणात झाली आणि त्याला संघ संस्कारांची जोड मिळाली. सहवासात आलेल्या चांगल्या माणसांकडून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुंदर रितीने साकारले. घरातील संघप्रेमी वातावरणामुळे समाजकारणाची आवड वाढत गेली. घरात शिस्त होती. वडील गंगाधरराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी. समाजकारणाचे धडे ते आपल्या घरात वडिलांकडूनच गिरवत होते. राजकीय जीवनात आपण कसे असायला हवे, याचा आदर्श त्यांच्या घरातून त्यांना दररोज पाहायला मिळत होता. परंतु, व
Devendra Fadanvis भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच, गेल्या दहा-बारा वर्षांत नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ आपल्या देवाभाऊंनी सातत्याने केलेला संघर्ष डोळ्यासमोरुन गेला. विधिमंडळात मी पाहिलेली देवाभाऊंची तडफदार कारकीर्द आठवली. काही तासांतच महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊन नव्या इतिहासाची नोंद झाली. त्यावेळी या अतुलनीय कामगिरीबद्दल देवाभाऊंचा अभिमान वाटला.
राजकारण हे अमृतमंथनासारखे असते, असे म्हणतात. म्हणजे, राजकारणातून अमृतही बाहेर पडते आणि विषही! ते विष पचवणारे ‘निळकंठ’ म्हणजे आमचे नेते देवेंद्र फडणवीस! देवेंद्रजींना राजकारणातले ‘चाणक्य’ अशी उपमा अनेकांनी दिली. ते चाणक्य आहेतच. मी त्यापुढे जाऊन त्यांना राजकारणातला ‘योगी’ असे संबोधेन. कारण, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा परीक्षा पाहणारा ठरला. प्रत्येकवेळी ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नेतृत्व किती प्रगल्भ असावे, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने सलग तिसऱ्यांदा महायुतीला पसंती दर्शवली असून, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार विराजमान होण्याचा अंदाज मतदानोत्तर कलांमधून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे यंदाही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.
Devendra Fadanvis विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात महायुतीची विजय निर्धार सभा आयोजित करण्यात आली. ही सभा दि: ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे जाहीर करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. "बाळासाहेबांच्या नावातून हिंदूहृदयसम्राट शब्द वगळला, औरंगजेबाची नाव घेण्याची लाज वाटू लागली", असल्याची टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.
प्रत्येकाचे कर्तृत्व हे त्या व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात केलेल्या एकूणच कामगिरीवरून ठरवले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्याही राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामापासून झाला. पुढे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, ते नागपूरचे नगरसेवक, महापौर, आमदार आणि ४४व्या वर्षी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अशी त्यांची यशस्वी घोडदौड ही सर्वस्वी थक्क करणारी. पण, या वेगवेगळ्या टप्प्यातून पार पडलेला प्रवास वाटतो तितका सोपा नाही. त्यासाठी फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली. या मेहनतीबरोबरच त्यांची
Devendra Fadanvis नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
संजय राऊत हे पावसाळ्यातील गमबूट आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची हिंमत करु नये, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे येथील कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर दि. १९ मे २०२४ रोजी पहाटे २.३० वाजता झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी सकाळी ८.१३ वाजता गुन्हा नोंदविला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यात सक्रियतेने कार्यवाही केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. ११ जुलै रोजी विधान परिषदेत स्पष्ट केले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेत पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
“स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांना लावण्यात येणार आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही, तर वीजबचतीचा पैसा वापरण्यात येणार आहे,” अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी विधानसभेत दिली. ‘नियम 293’ अन्वये उपस्थित ऊर्जा विभागाच्या विषयातील बाबींना त्यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “चुकीच्या गोष्टी सांगून तुम्ही जिंकलात, पण स्मार्ट मीटरची योजना तयार कोणी तयार केली, तर ती महाविकास आघाडी सरकारने. आम्ही सामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणार नाही
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकांउंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.
'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय?
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.
नुकताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते.
मुंबई : आज खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या उपाययोजनांवर चर्चा झाली. ही बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आजची खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. घरगुती बियाणांसोबतच बियाणेबदलीसाठीदेखील मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. त्याचप्रमाणे खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावा यासाठीदेखील शासनपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंच्या प्रतिक्रियेचा समााचार घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले की, ठाकरेंनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. राज्यपालांचा निर्णय कोर्टाने अवैध ठरविला हे आम्ही मान्य करतो. तसेच, निवडणूक आयोगाने आम्हाला राजकीय पक्ष असल्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आमचंच सरकार राहणार आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी टीकास्त्र डागले.
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते सत्तासंघर्षावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्या पक्षात इनकमिंग सुरूच आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, पक्षात नवीन कार्यकर्ते येत आहेत, आणि हे कायमच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर निकाल दिला. निकालपत्राद्वारे सुप्रीम कोर्टाने तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यपालांच्या टिप्पणीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांबाबत काही टिप्पणी केली असली तरी राज्यपालांनी पुढे राबवलेल्या प्रक्रियेला नाकारलेले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमच्या सरकारला नवा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे राज्यात आमचे सर
रविवारी बालेवाडीत पार पडलेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अभिनेता आमिर खान उपस्थित होते. यावेळी जल संवर्धन आणि शेतकऱ्यांबद्दल उदाहरण देताना देवेंद्र यांनी सत्यमेव ज्यातेच्या वॉटर कप उपक्रमाचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपल्या शेतकऱ्यांमध्ये उडी मारून समुद्र पार करून जाणाऱ्या हनुमानाएवढी ताकद असते. पण त्यांना त्यांचा शक्तीची जाणिव करून देण्याची गरज भासते. आमिर यांच्या वॉटर कप उपक्रमाने हे काम केले त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो."
राज्य शासनाने राज्यातील कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला नोकरी व पुढील शिक्षणाची हमी देणारी येजना सुरू केली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबिवण्यात येत असून या वर्षांत किमान १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून काही आमूलाग्र बदल सातत्याने होत आहेत. पीक विमा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'क्रेड' कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मुलाखत घेतली.
ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. जे स्वतः कुटुंबाला वेळ देत नाही पण त्यांच्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत रोज वेळ घालवतो. जे केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता महाराष्ट्रातील तब्बल करोडो कुटुंबाची काळजी घेतात, त्यांच्या सुरक्षेसाठी सदा तत्पर असतात ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. याच पोलिसांच्या बोरिवलीतील वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. 26 जुलै रोजी भेट दिली होती. त्यानंतर त्वरित बुधवारी बैठकीत पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी
वेदांता फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला याबद्दल जोरदार राजकीय घमासान सुरु आहे.
सांगली येथे घडलेल्या साधूंच्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारणाची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत