जवळपास तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर आता ‘अनलॉकिंग’ची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. लॉकडाउनचा फटका अर्थातच उद्योग जगताला बसला असून यामध्ये एमएसएमई अर्थात सूक्ष्म–लघु–मध्यम उद्योगांना याची सर्वाधिक झळ बसल्याचं दिसतं. म्हणूनच, केंद्र सरकारच्या ‘पॅकेज’पासून ते उद्योगविषयक विविध निर्णयांमध्ये एमएसएमईला महत्त्वाचं स्थान दिलं जात आहे. याचसंबंधी केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत एमएसएमई विकास संस्था, मुंबईचे साहाय्यक संचालक तथा क्लस्टर डेव्हलपमेंट ऑफिसर अभय दप्तरदार यांची सा. ‘विवेक’ने विशेष मुलाखत घेतली. या वेळी दप्तरदार यांनी उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.