भारतीय राज्यघटनेतील सत्ताविभागणी ही बांधीलकीवर आधारलेली आहे. विधीमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या एकमेकांवर अवलंबून असूनही घटनात्मक चौकटीत कार्य करतात. हीच रचना भारतीय लोकशाहीला स्थैर्य देते आणि लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करते. म्हणूनच भारतीय संविधानात सत्तांची स्पर्धा नव्हे, तर सत्तांचे सहअस्तित्व आणि परस्पर जबाबदारी हेच लोकशाहीचे खरे अधिष्ठान मानले गेले आहे. म्हणूनच सत्तांची विभागणी ही केवळ प्रशासकीय रचना नसून, ती भारतीय लोकशाहीची आत्मा आहे.
शेजारी देशांमध्ये झालेली हिंसक आंदोलने बघून आपल्या देशातल्या अनेक पुरोगामी विचारवंतांना डोहाळे लागले आहेत की, हे सगळं आपल्या देशात केव्हा एकदा घडतंय! पण हे भिकेचे डोहाळे निरर्थक आहेत. एक तर भारतात लोकशाही पूर्ण रुजलीय आणि सध्याचे सरकारही पुरेसे सक्षम आणि समर्थ आहे. भारतीय सैन्य हा तर आमच्या नितांत अभिमानाचा विषय आहे. ही आमच्या प्रजासत्ताकाची शक्ती आहे. ती दिवसेंदिवस अशीच वाढती राहो, ‘बलसागर भारत होवो’...
गेल्या 75 वर्षांत भारतीय प्रजासत्ताकाने संविधान, संसद, सरकारे आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून नागरिकांच्या नागरी हक्कांचे संरक्षण व संवर्धन केले आहे. मूलभूत हक्क, निदेशक तत्त्वे आणि न्यायालयीन सक्रियता यांच्या बळावर भारत आजही सामाजिक न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांवर ठाम उभा आहे.
फेब्रुवारी 2019मध्ये दिल्ली-वाराणसी या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन धावल्यानंतर त्यांचे जाळे देशभर झपाट्याने विस्तारले आहे. आता देशभरात ब्याऐंशी मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. विविध राज्यांतील महत्त्वाची शहरे, धार्मिक केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि प्रशासकीय राजधानी या ट्रेन्सनी जोडली जात आहेत. या ट्रेनमुळे वेळेची बचतही होत आहे. यातील सोयीसुविधा पारंपरिक गाड्यांपेक्षा खूपच प्रगत आहेत. आजवर धावणार्या सर्व वंदे भारत ट्रेन या दिवसाच्या प्रवासासाठी असल्यामुळे त्यात केवळ बसण्याची सोय होती. दीर्घ अंतराच्या
भविष्याचा वेध घेत भारताला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवू शकेल असे थोरियमवर आधारित तंत्रज्ञान भारताकडे नसल्यामुळे त्या दिशेने परिणामकारक वाटचाल सुरू करण्यासाठी आजवर झालेली कोंडी फोडण्यासाठी हे बदल करणे नितांत गरजेचे होते. सेमीकंडक्टरनिर्मिती प्रकल्पांप्रमाणेच अणुऊर्जा प्रकल्पांसाठी फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. त्यामुळे बहुतांशी प्रकल्प समुद्रकिनार्यावर स्थित असतात. बारमाही नद्या किंवा मोठे जलाशय हे पर्याय उपलब्ध असल्यास हे प्रकल्प देशाच्या अंतर्गत भागात उभे करता येतात.
तामिळनाडूचे वर्णन वेदांची भूमी असे केले गेले आहे, जिथे सनातन संस्कृतीचे सार जपले गेले आहे, मग स्टॅलिन यांना कोणती ओळख उखडून काढायची आहे? तसे ते त्यांनी आधीपासून ठरवलेच आहे, कारण त्यांचा भारतीयच काय पण तमिळ संस्कृतीशी अगदी नावापुरताही संबंध नाही. त्यांचे नावच मुळी नरपिशाच म्हणता येईल अशा रशियातील स्टॅलिनकडून त्यांनी उसने घेतले आहे. तेव्हा ते स्टॅलिनप्रमाणेच आपल्या विरोधकांच्या नरसंहाराची भाषा बोलणार, यात नवल ते काय? पण त्यांचे ढोंग न्यायालयात उघडे पडले आहे.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
अश्विनी हे देवांचे वैद्य असलेल्या अश्विनीकुमारांचे नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला कुचला, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेद या दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. विषद्रु म्हणजे विषारी वृक्ष असंच नाव असलेल्या या कुचल्याचा सुयोग्य वापर अमृततुल्य ठरतो. अश्विनी नक्षत्रावर जन्माला येणार्या व्यक्तींनी कुचल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत!
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रू
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ या नवीन शाखेची स्थापना केली. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तसेच इस्रोकडून भविष्यातील चांद्रयान 5 आणि गगनयान मोहिमांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे यापुढे अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतीलच. नक्की या मोहिमा कशा असतील, त्याचबरोबर यापूर्वी ंयशस्वी झालेल्या मोहिमांबद्दल माहिती देणारा लेख...
या वर्षीचा 101वा दत्तजयंती संगीत महोत्सव मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित झाल्यामुळे त्याची व्यापकता विस्तारली. दि. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान ’एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झालेल्या या स्वरोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी झाले होते. शहरातील अन्य कलासाधकांचा सहभाग, रसिकश्रोत्यांचा प्रतिसाद पाहता हा महोत्सव मराठवाड्यातील सवाई गंधर्व ठरू शकतो, ही आशा बाळगायला हरकत नाही.
नाशिकच्या ग्रमाविकासच्या कार्यकर्त्यांनी गारे काकांच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेल्या प्रेरणेने यंदाही वनवासी पाड्यात जाऊन भगिनींबरोबर भाऊबीज आणि स्नेहभोजन करून दिवाळी सण साजरा केला.
पुणे : हिंदू धर्मात ’गोदान’ करण्याचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. सवत्स धेनूचे दान अधिक पुण्यकारक समजले जाते. हिंदुस्थान प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित उपक्रम आपल्या संस्कृतीची सुंदर सामाजिक वीण अधोरेखित करतो. काळाच्या ओघात या संस्काराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि सध्याच्या स्थितीतही दुर्मीळ झालेला ’गोदान’ संस्कार कधीकधी घडतो. हा गोदानाचा संस्कार पुण्याजवळ, हिंगणघाट (उरळीकांचन) ता. हवेली येथे नुकताच पार पडला.
पुण्यमयी गोदावरी माईच्या पवित्र तीरावर जेव्हा सायंकाळच्या पावन आरतीच्या मंगलघंटा निनादू लागतात, तेव्हा निसर्गही थांबून त्या क्षणाचा साक्षीदार होतो. मात्र यंदाच्या आरतीत एक वेगळंच तेज, वेगळीच अनुभूती होती; जेव्हा शीख समुदायाच्या भाविकांच्या भावपूर्ण घोषणा त्या मंत्रगजरात मिसळल्या...
एक गोष्ट लक्षात ठेवावी की, फळे नैसर्गिक स्वरूपात म्हणजे तशीच खावीत, बाजारात मिळणारे त्यांचे रस किंवा डबाबंद काप खाल्ल्यास उपयोग होत नाही. त्यातही काकडी, सफरचंद, मोसंबी, संत्रे, बोरे, जांभळे, बेरीज अशी फळे जास्त उपयुक्त असतात. भाज्यांचेही तेच आहे. शिजवून खाल्लेल्या भाजीपेक्षा कच्चा भाजीपाला आहारात असल्यास वजन कमी करायला तो अधिक उपयुक्त ठरतो.
भरणी नक्षत्राचे दैवत ‘यमराज’ आहेत; तर आवळा हे ‘अमृत’ देणारे फळ आहे. हा विरोधाभास अतिशय बोलका आहे! यम जसा जीवनातील सत्य आणि संयम शिकवतो, तसाच आवळा शरीरातील दोषांचे ‘नियमन’ करून शरीराला मृत्यूपासून लांब ठेवतो. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या परिसरात किमान एक तरी आवळ्याचे झाड लावायलाच हवे.
The resolution and achievement of weight loss
वजन कमी केल्यामुळे सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य सुधारते, मानसिक स्थैर्य लाभते आणि आयुष्यात एक आश्वासक प्रकाश दिसू लागतो. वजन कमी करण्यासाठी लागणार्या प्रयत्नात आहारावर आणि अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण आल्याने पैशांचीदेखील बचत होऊ लागते, कामात उत्साह आल्याने अनेक सक्रीय गोष्टी कराव्याशा वाटू लागतात. परिणामतः संपूर्ण जीवन निरामय होण्याच्या दिशेने वाटचाल होऊ लागते.
कोकणच्या निसर्गाशी आणि शेतकर्यांच्या जीवनाशी अतूट नातं असलेल्या नारळाचा उद्योग आज उत्पादन घट, कीड व व्यवस्थापन यामुळे अडचणीत आहे. माडांचे आरोग्य सुधारले तरच नारळ उत्पादन वाढेल आणि शेतकर्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होईल, हीच या लेखाची मध्यवर्ती भूमिका आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर पडणारा ताण आणि वाढता कचरा ही आजची मोठी समस्या आहे. यावर उत्तर म्हणून चक्रीय अर्थव्यवस्था पुढे येते. पूर्णपणे वापरता येणारा, जैविक आणि बहुपयोगी बांबू हा कमी कर्ब उत्सर्जनासह उत्पादन, पुनर्वापर आणि पर्यावरणस्नेही विकासाचा मजबूत आधार ठरतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेतकरी पांडुरंग विष्णू राणे यांनी परंपरा, प्रयोगशीलता आणि शास्त्रीय अभ्यास यांची सांगड घालत शेती, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा समतोल साधणारे शाश्वत मॉडेल उभे केले आहे. ‘जीविषा‘ संस्थेद्वारे ते नैसर्गिक शेती, प्रशिक्षण आणि प्रयोगातून शेतकर्यांना स्वावलंबी, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी मार्गदर्शन देतात. निसर्गसंवर्धन, अन्नस्वयंपूर्णता आणि स्वावलंबी विकास यांचा हा प्रवास आज अनेकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
कँडी वाफविण्यासाठी ठेवलेले आवळे उतरवणे, मिक्स लोणच्यासाठी गाजर, कोबी, हिरव्या मिरच्या निवडणे, चटणीसाठी आणलेल्या कडीपत्त्याची पाने निवडून ती धुणे, डिंक लाडूसाठी कोणता सुकामेवा आहे व कोणता नाही, याची नोंद घेऊन काजू, बदाम आपल्या पतीला आणायला सांगणे, त्याचवेळी एका ग्राहकाचा ऑर्डरसाठी आलेला फोन उचलून त्यांची व्यवस्थित ऑर्डर घेणे, शिवाय मुंबई येथील प्रदर्शनासाठी दुसर्या दिवशी जायचे असल्याने त्यासाठी बॅगा भरण्याची तयारी... ही सगळी कामे एकाच वेळी अवंतिका सुकळकर करीत असताना पाहिले की आपणही थक्क होऊन जातो. विशेष म्ह
क्रीडा विश्लेषक म्हणजे Sports Analyst होय. क्रीडा क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी लागणारी तयारी ह्या विषयी आपण मागील लेखामध्ये जाणून घेतले. क्रीडा क्षेत्रातील आपल्या passion ला profession मध्ये रूपांतरित करणार्या विद्यार्थ्यांचे आपण उदाहरण वाचले. पण क्रीडा विश्लेषक म्हणजे नक्की काय, हे आज आपण जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि विविध क्रीडा उपक्रमांत गुंतवणूक वाढल्यामुळे क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन बदलला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रातील खेळाडूंनी पदके कमवून जागतिक पटलावर क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे खेळात करिअर होऊ शकते हे निश्चित. पण त्याचबरोबर मुलं आणि पालकांच्या समोर क्रीडा क्षेत्रात कोणकोणत्या प्रकारची करिअर संधी आहेत?, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खेळातून सुरक्षित भविष्य घडू शकते का? हे प्रश्न आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने त्यांना बर्याच वर्षांच्या संघर्षानंतर स्वत:ची ओळख मिळालीय. खरं तर त्यांची मागच्या दहा वर्षांतील कामगिरी बघितली तर विश्वचषकातील विजय हा कधी ना कधी त्यांच्या पदरात पडलाच असता. पण तो प्रत्यक्ष पडला की, भोवतालची परिस्थिती कशी बदलते याचा अनुभव आता महिला क्रिकेटपटूंना येईल. विराट आणि रोहितसारखे त्यांना लक्षावधी चाहते नसतील. पण, नवीन चाहता वर्ग आणखी वाढेल एवढं नक्की.
जॉर्जियातील बटुमी येथे 5 ते 29 जुलै या दरम्यान फिडे महिला विश्वचषक खेळला गेला. गेल्या 3-4 वर्षांत बुद्धिबळ खेळात भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मात्र त्यात प्रामुख्याने गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन अशा पुरुष खेळाडूंची नावे सातत्याने ऐकायला मिळत होती. पण ह्यावेळी महिलांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आणि एकीकडे तेंडुलकर - अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका उत्कंठावर्धक स्थितीत असतानाही समाजमाध्यमांना आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. महिलांचा हा विश्वचषक भारतीय खेळाडूंनीच गाजवला आणि थेट जेतेपदाला गवसणी घात
दादा यांचे 2 जानेवारी 2026 रोजी रात्री निधन झाले. गेली जवळजवळ पंचवीस वर्षे भारताबाहेर राहिल्यानंतरही, त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या आठवड्यात मी व माझी पत्नी स्मिता (आणि माझी मोठी बहीण अर्चना) - आम्ही तिघेही अक्षरशः त्यांच्या शेजारी उपस्थित राहू शकलो, हे आमचे मोठे सौभाग्य मानतो. 2 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी शांतपणे देह ठेवला. ती पौर्णिमेची रात्र होती - जणू देवानेच दादांच्या प्रस्थानासाठी योग्य वेळ निवडली होती.
दादांच्या आचरणातून आम्ही दोन्ही भावंडांनी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन शिकला. त्यांचे विचार, चिंतन आणि कृती यातून कालांतराने साकल्याने विचार करण्याची दृष्टी मिळाली. त्याचसोबत महत्त्वाचे दादांंचे अनमोल धन म्हणजे समाजसेवा आणि माणसं जोडण्याची कला हा आमच्यासाठी पाठ आहे. त्यांच्या विविध गुणांचे आणि कार्यांचे अल्प अनुकरण जरी आम्हाला शक्य झाले तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर अनेक क्लिष्ट विषय अशोकरावांनी सोपे करून मांडले आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या विचारकक्षा विस्तृत केल्या. जुन्या काळातले ज्ञानतपस्वी कसे असतील याचा प्रत्यय देणारे अशोकराव, व्यक्तिगत बोलण्यात तितकेच मृदू, अतिशय संवेदनशील आणि शब्दशः बापाची माया देणारे होते.
संघासारखे वैचारिक आंदोलन भक्कम करण्यासाठी स्वयंसेवकास संघशरणता आणि बौद्धिक क्षमता या दोहोंमध्ये पारंगत होणे गरजेचे आहे. हे कौशल्य थोड्याच स्वयंसेवकांकडे असते. अशोकजी मोडक अशा थोड्याच स्वयंसेवकांच्या श्रेणीत येतात.
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये